जेव्हा जम्मू मधील ही मुलगी रात्री निधिवन मध्ये गेली, तिथे जे घडले पाहून तुम्हालाही धक्का बसेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण यांना पाहण्यासाठी एक मुलगी जम्मू वरून वृंदावनात येते. श्रीकृष्णाचे साक्षात रूप पाहण्यासाठी ती मुलगी श्रीकृष्णाच्या प्रत्येक मंदिरात जात होती, परंतु श्रीकृष्णाचा साक्षात रूप तिला पाहायला मिळत नव्हते. तिला कोणीतरी सांगितले की, जर तुला श्रीकृष्णाला पाहायचे असेल तर वृंदावन मधील निधी वनामध्ये जा. निधीवन हे एकमेव ठिकाण आहे,

जेथे श्रीकृष्ण रोज रात्री साक्षात रूपात येतात. हे ऐकताच ती मुलगी निधीवनात जाते आणि रात्री झाडांच्या पाठीमागे लपून बसते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिला असे काही दिसते की ते पाहून ती आश्चर्यचकित होते. त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून तुम्हाला विश्वास करणे कठीण होऊन जाईल. जम्मू येथील कटरा गावातील एक मुलगी आपल्या आई सोबत,

भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात लहानपणापासूनच जात असायची. तिची आई भगवान श्रीकृष्णाची रोज पूजा पाठ करायची. ही छोटी मुलगी आपल्या आईला रोज पूजा पाठ करताना पाहत असे. पूजा पाठ करत असतानाच एके दिवशी त्या मुलीने आपल्या आईला विचारले की, भगवान श्रीकृष्ण माझ्याशी कधी बोलणार ? यावर तिची आई म्हणाली –

जेव्हा तू भगवान श्रीकृष्ण एवढी मोठी होणार तेव्हा भगवान श्रीकृष्ण तुझ्याशी बोलणार. ती मुलगी मोठी झाली व भगवान श्रीकृष्ण आपल्याशी कधी बोलणार याची वाट पाहू लागली. भगवान श्रीकृष्ण आपल्याशी बोलावे यासाठी आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिने केली परंतु भगवान श्रीकृष्णाने साक्षात दर्शन दिले नाही. काही दिवसांनी तिला समजले की भगवान श्रीकृष्ण तर वृंदावन मध्ये राहतात.

वृंदावन येथे जाऊन तिने सर्वांना विचारलं की श्रीकृष्ण कुठे मिळतील ? सर्वांनी सांगितले की कान्हा बाके बिहारी मंदिरात मिळतील. हे ऐकून ती मुलगी मटका भर दही आणि बासुरी घेऊन श्रीकृष्णाला भेटायला त्या मंदिरात जाते. त्या मुलीला प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भेटायचे होते, परंतु मंदिरामध्ये असलेली मूर्ती पाहून ती नाराज झाली. तिला पुजाऱ्यांनी सांगितले की,

तुला फक्त मूर्तीच पाहायला मिळणार बाकी काही नाही. हे सर्व घटना घडत असताना तेथे एक वृद्ध म्हातारा उभा होता, तो हे सर्व पाहत होता. वृद्ध माणूस तिच्याकडे येऊन म्हणाला की, “जर तुला साक्षात कान्हाचे रूप पाहायचे असेल तर तुला निधीवन मध्ये जावे लागेल”. त्याच रात्री ती मुलगी निधी वनात गेली आणि श्रीकृष्णाची वाट पाहू लागली दीड वाजायच्या सुमारास,

तेथे असलेली सर्व झाडे गोपिकांमध्ये परिवर्तित झाली. थोड्याच वेळात स्वतः श्रीकृष्ण तेथे येऊन बासरी वाजवू लागले, हे सर्व दृश्य पाहून ती मुलगी श्रीकृष्ण जवळ आली आणि त्यांना म्हणाली की, मला सोडून जाऊ नका. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, मी तर तुझ्या मनातच आहे, मी तुला सोडून कुठेही गेलो नाही. भगवान श्रीकृष्णाने तिला ते तिच्या शरीराच्या प्रत्येक कणात असल्याचा साक्षात्कार देला.

हे सर्व पाहताच ती मुलगी बेशुद्ध झाली. ज्यावेळी तिला शुद्ध आली त्यावेळी तिने पाहिले की तिला प्रत्येक कणांमध्ये भगवान श्रीकृष्ण दिसत होते. या मुलीने पुढे जाऊन श्रीकृष्णांची विधिवत लग्न देखील केले. या मुलीला पूर्ण सृष्टी “मीरा” या नावाने ओळखते. टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.